Sunday, May 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या 'व्हीबी-जी राम जी' योजनेत १२५ दिवस...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका मिशन-ग्रामीण’ म्हणजेच ‘व्हीबी-जी राम जी’ योजना कायदा घेणार आहे.या नवीन कायद्यानुसार आता प्रत्येक ग्रामीण भागातील कुटुंबाला वर्षातून १२५ दिवस काम देण्याची हमी मिळेल,जी यापूर्वी १०० दिवस होती.यामुळे गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना अधिक काम मिळेल आणि त्यांची आर्थिक सुरक्षा मजबूत होणार आहे; असे सरकारचे म्हणणे आहे.पण,काहींच्या मते,इकडे १०० दिवसांचेच काम मिळत नाही अन् सरकार म्हणते दीडशे दिवस.सदरचा नवीन कायदा हा येत्या,बुधवार १ जुलै २०२६ पासून देशभरात लागू केला जाणार आहे.तत्पूर्वी ‘व्हीबी-जी राम जी’ कायद्याचे मसुदा नियम जारी करण्यात आले असून केंद्र सरकारने यावर जनता तसेच संस्थांकडून सूचना मागवल्या आहेत.मसुदा नियमांमध्ये रोजगार हमी योजनामधून व्हीबी-जी राम जी मध्ये बदलाची प्रक्रियादेखील स्पष्ट केली आहे.व्हीबी-जी राम जी ही नवीन ग्रामीण रोजगार हमी योजना असेल,जी सध्याच्या रोजगार हमीची जागा घेईल.बदलाच्या काळात सुरू असलेली कामे थांबणार नाहीत. कायद्याच्या कलम २२ नुसार या योजनेचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारे मिळून उचलतील.सामान्य राज्यांमध्ये खर्चाची विभागणी ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के राज्य यांच्यात होईल. जुन्या बिलांचे पेमेंट केले जाईल.आवश्यक नोंदी नवीन प्रणालीमध्ये हस्तांतरित केल्या जातील.ई-केवायसीद्वारे पडताळणी केल्यानंतर जॉब कार्डदेखील वैध ठरवले जातील.जोपर्यंत राज्ये नवीन योजना लागू करण्याची अधिसूचना जारी करत नाहीत,तोपर्यंत मजुरांचे सध्याचे अधिकारदेखील सुरू राहतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

उभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!