- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका मिशन-ग्रामीण’ म्हणजेच ‘व्हीबी-जी राम जी’ योजना कायदा घेणार आहे.या नवीन कायद्यानुसार आता प्रत्येक ग्रामीण भागातील कुटुंबाला वर्षातून १२५ दिवस काम देण्याची हमी मिळेल,जी यापूर्वी १०० दिवस होती.यामुळे गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना अधिक काम मिळेल आणि त्यांची आर्थिक सुरक्षा मजबूत होणार आहे; असे सरकारचे म्हणणे आहे.पण,काहींच्या मते,इकडे १०० दिवसांचेच काम मिळत नाही अन् सरकार म्हणते दीडशे दिवस.सदरचा नवीन कायदा हा येत्या,बुधवार १ जुलै २०२६ पासून देशभरात लागू केला जाणार आहे.तत्पूर्वी ‘व्हीबी-जी राम जी’ कायद्याचे मसुदा नियम जारी करण्यात आले असून केंद्र सरकारने यावर जनता तसेच संस्थांकडून सूचना मागवल्या आहेत.मसुदा नियमांमध्ये रोजगार हमी योजनामधून व्हीबी-जी राम जी मध्ये बदलाची प्रक्रियादेखील स्पष्ट केली आहे.व्हीबी-जी राम जी ही नवीन ग्रामीण रोजगार हमी योजना असेल,जी सध्याच्या रोजगार हमीची जागा घेईल.बदलाच्या काळात सुरू असलेली कामे थांबणार नाहीत. कायद्याच्या कलम २२ नुसार या योजनेचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारे मिळून उचलतील.सामान्य राज्यांमध्ये खर्चाची विभागणी ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के राज्य यांच्यात होईल. जुन्या बिलांचे पेमेंट केले जाईल.आवश्यक नोंदी नवीन प्रणालीमध्ये हस्तांतरित केल्या जातील.ई-केवायसीद्वारे पडताळणी केल्यानंतर जॉब कार्डदेखील वैध ठरवले जातील.जोपर्यंत राज्ये नवीन योजना लागू करण्याची अधिसूचना जारी करत नाहीत,तोपर्यंत मजुरांचे सध्याचे अधिकारदेखील सुरू राहतील.
- Advertisement -

