- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे २४ वर्षीय मेघा आकाश बनारसे या महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने प्रकृती खालावली व त्यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेहासह रास्ता रोको आंदोलनानंतर अखेर घटनेस जबाबदार असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव काल,सोमवारी मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.
निलंबनाचा प्रस्ताव पाठविलेल्यांमध्ये बारव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चंद्रसुरेश डोंगरवार आणि प्रसूतीतज्ज्ञ रोशनी राऊत यांचा समावेश आहे.या डॉक्टरांवर आता काय कारवाई होणार,याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.महिलेच्या मृत्यूनंतर रविवारी दुपारी तीन वाजेपासून सुरू झालेले आंदोलन तब्बल ७ तासांनंतर विविध अधिकाऱ्यांसमक्ष प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर रात्री दहा वाजता मागे घेण्यात आले होते.खासदार, जिल्हा पोलिस अधिक्षक,यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली होती. त्यानंतर मृतदेह राज्यमार्गावरून उचलून रात्री उशिरा अंतिम संस्कार करण्यात आले.मेघा आकाश बनारसे या महिलेवर १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सरांडी (बु) प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिरात शस्त्रक्रिया पार पडली.त्याच दिवशी सायंकाळपासून तिला असह्य वेदना सुरू झाल्या.सलग तीन दिवस असह्य वेदना होत असतांना संबंधित डॉक्टर व चमूकडून तिच्या त्रासाचे निदान आणि त्यावर अपेक्षित उपचार न मिळाल्याने अखेर नाइलाजास्तव मरणाला टांगलेल्या मेघाला शस्त्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी भंडारा व त्यानंतर ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले.लाखोंचा खर्च करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबीयांनी नागपूर शासकीय मेडिकल कॉलेज येथे १८ जानेवारीला भरती केले.मात्र,तिथे भरती केल्याच्या दिवशीच रात्री नऊच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.मृत मेघाला साडेतीन व एक वर्ष वयाची दोन मुले आहेत.तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या दोन चिमुकल्यांची आबाळ होऊ नये; यासाठी त्यांच्या पोषणाची जबाबदारी सरकारने घ्यावी,अशी आमची मागणी असल्याचे आंदोलकांनी सांगितले होते.यापूर्वी २ जानेवारीला बनारसे कुटुंबीयांनी सरांडी (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषण केले होते.
- Advertisement -

