Monday, September 7, 2026
Homeभंडारासरपंचपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर प्रकरणी महिला सरपंचा अपात्र...

सरपंचपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर प्रकरणी महिला सरपंचा अपात्र…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सरपंचपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून लाखांदूर तालुक्याच्या
दिघोरी मोठी येथील महिला सरपंचाला अपात्र घोषित करण्यात आले.सदरची कारवाई नागपूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशावरून करण्यात आली. सुनीता संजय साळवे असे अपात्र महिला सरपंचाचे नाव आहे.
२०२३ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत तहसीलच्या दिघोरी/मो. ग्रामपंचायतमध्ये सुनीता साळवे यांना थेट जनतेने सरपंचपदासाठी निवडून दिले होते.तर इतर १२ जण ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून निवडून आले होते. एकंदरीत सरपंचासह १३ गावातील अधिकारी गेल्या वर्षभरापासून गावाचा कारभार बिनविरोध चालवत होते.गेल्या काही महिन्यांपासून सदस्यांची मान्यता न घेता स्वतःच्या मर्जीने कारभार करण्याचा आरोप करीत उपसरपंच व इतर सदस्यांनी याप्रकरणी नागपूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करून महिला सरपंचाला सदस्यपदावरून अपात्र ठरवावे,अशी मागणी केली होती.त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले.या आरोपांसह भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांनी महिला सरपंचाला नियमबाह्य काम करण्यासह कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी ठरविले.त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी महिला सरपंचाविरुद्ध आदेश काढून त्यांना सदस्यपदासह सरपंचपदावरून अपात्र घोषित केले.विद्यमान महिला सरपंचाला अपात्र घोषित करण्यात आले आहे.या स्थितीत रिक्त असलेला पदभार विद्यमान उपसरपंच विजय खोब्रागडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!