Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजआरमोरी विधानसभा क्षेत्रात 'चहापेक्षा केटली झाली गरम..!' -मतदारसंघातील चित्राबाबत विश्लेषकांनी बोलणे टाळले..

आरमोरी विधानसभा क्षेत्रात ‘चहापेक्षा केटली झाली गरम..!’ -मतदारसंघातील चित्राबाबत विश्लेषकांनी बोलणे टाळले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्यात विधासाभा निवडणुकांचे बिगुल वाजले जरी असले तरी जागावाटपाचा तिढा अजूनही कायमच आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहेत.अशातच ‘चहापेक्षा केटली गरम झाली’ असल्याचा प्रत्यय सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा क्षेत्रात दिसून येत आहे.विधानसभा निवडणूक जाहीर होताच उमेदवारांचे समर्थक आणि विरोधक हे सोशल माध्यमांवर सक्रिय झाले आहेत. सकाळी,दुपारी आणि रात्री समर्थकांकडून एखादी पोस्ट व्हॉटस्ॲपवर टाकली जाते आणि नंतर स्पर्धक उमेदवाराचे समर्थक सुध्दा त्यावर तिखट प्रतिक्रिया देतात.कुणी पाच तर कुणी वीस वर्षांचा हिशोब मागतो.त्यामुळे उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये यावरून सोशल मीडियावर जोरदार वॉर सुरु असल्याचे चित्र आहे.
बरेचदा निवडणूक आचारसंहितेचा भंग सुद्धा होतो पण याकडे यंत्रणेचे फारसे लक्ष नसते.त्यामुळे उमेदवारांचे समर्थक आणि विरोधक याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा मतदारसंघापैकी आरमोरी मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.यात आरमोरी मतदारसंघात चूरस पूर्ण निवडणूक होण्याची शक्यता आहे.तर शेवटपर्यंत या मतदारसंघात काय चित्र असेल यावर विश्लेषकांनी सध्या बोलणे टाळले आहे.निवडणुका म्हटले की,आरोप प्रत्यारोप आलेच यात काही नवीन नाही.सोशल माध्यमांवर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट आणि त्यावर होणाऱ्या वादाकडे उमेदवार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत.यावर कसलीही प्रतिक्रिया देणे टाळत आहेत.ते योग्य देखील आहे. मात्र,सध्या उमेदवारांचे समर्थक आपल्याच उमेदवारांना तिकीट झाल्याचे भासवित असल्याने तशी जोरदार पोस्टर बाजी सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे.काहींच्या मते,पुरे झाल्या संधी. जनतेंनी अनेकांना संधी दिल्यात,आता नव्यांना संधी देणे आवश्यक आहे.महत्वाचे म्हणजे,ज्यांच्याकडे सर्वात जास्त सेना तयार झाली आहे; अशांनाच उमेदवारी मिळावी; असा जनतेचा कौल दिसून येतो आहे.अन्यथा बाजी मारणारे ‘तेच’ असा सूर उमटू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!