Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. - तीन प्रगतशील शेतकऱ्यांना 'वसंतराव...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर केला आहे.आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,उत्पादनवाढीसाठी केलेले प्रयोग आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या कार्यामुळे या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, संस्था आणि कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार,वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, कृषिभूषण(सेंद्रिय शेती)पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार,उद्यानपंडित पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
या पुरस्कारांचे वितरण येत्या,१ जुलै २०२६ रोजी मुंबई येथील वरळी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात माननीय राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
  • सन २०२३-२४ साठी पुरस्कारार्थी👇
सन २०२३-२४ साठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार(सर्वसाधारण गट)हा पुरस्कार आरमोरी तालुक्यातील शंकरनगर(पो.जोगीसाखरा)येथील विष्णुपद प्रभाष गाईन यांना जाहीर झाला आहे.तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार(आदिवासी गट)हा पुरस्कार एटापल्ली तालुक्यातील वडसाकला येथील दयाराम सुखरू सिडाम यांना घोषित करण्यात आला आहे.
  • सन २०२४-२५ साठी पुरस्कारार्थी👇
सन २०२४-२५ साठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार(सर्वसाधारण गट)हा पुरस्कार आरमोरी तालुक्यातील कोरेगाव(पो.रांगी)येथील पुरुषोत्तम झेलुजी जांभूळकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • पुरस्काराचे स्वरूप👇
या पुरस्कारात विजेत्या शेतकऱ्याला ४४ हजार रुपयांचा धनादेश,स्मृतिचिन्ह(ट्रॉफी),प्रशस्तिपत्र तसेच सपत्नीक/पतीसह विशेष सत्कार करण्यात येतो.
  • कृषी क्षेत्रातील आदर्श कार्याची दखल👇
शेतीमध्ये नवनवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे,उत्पादनात भरीव वाढ साध्य करणे, कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग राबविणे आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आदर्श कार्य करणे या कठोर निकषांच्या आधारे कृषी विभागाकडून या तिन्ही शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!