Sunday, June 21, 2026
Homeचंद्रपूरशिक्षण विभागाची परवानगी न घेताच सुरू केल्या शाळा; दोन शाळा ठरल्या अनधिकृत…

शिक्षण विभागाची परवानगी न घेताच सुरू केल्या शाळा; दोन शाळा ठरल्या अनधिकृत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-शिक्षण विभागाची परवानगी न घेता सुरू केलेल्या शाळेला अनधिकृत करण्यात येत असते. दरवर्षीच हंगाम सुरू होताना परवानगी न घेतलेल्या तसेच विविध त्रुटी असणाऱ्या शाळांना अनधिकृत घोषित केले जाते.यंदा चंद्रपूर जिल्ह्यातील दोन शाळांना अनधिकृत करण्यात आले आहे.यामध्ये सावली तालुक्यातील पाथरी येथील अमरदीप इंग्लिश मीडियम स्कूल व चंद्रपूर येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे.शालेय शिक्षण विभागाच्या मान्यता प्रमाणपत्राशिवाय शाळा सुरू केल्यास किंवा शिक्षण विभागाने काही त्रुटी काढल्यास मान्यता काढून घेतल्यास शाळेला अनधिकृत केले जाते.या शाळेमध्ये प्रवेशाला बंदी असते.दरवर्षीच नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर करत असते.यंदा प्रसिद्ध झालेल्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश आहे.या दोन्ही शाळा बंद करण्यात आल्या असून त्या शाळेच्या समोर तसे सूचना फलकही शिक्षण विभागाने लावले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य...

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!