Thursday, August 6, 2026
Homeनागपूरखतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून मोठी व्हावीत म्हणून कुठलाही प्रसंग आडकाठी येऊ नये यासाठी जीवाचे रान करून शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण,सिस्टमच लालसेने भरलेला असेल तर.. सर्वसामान्यांची काय केवा?अश्यातच वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट यूजी-२०२६'(NEET-UG)ची परीक्षा ३ मे २०२६ रोजी २२ लाखांहून अधिकच्या विद्यार्थ्यांनी दिली होती. मात्र,परीक्षेतील पेपरफुटीच्या संशयावरून १२ मे २०२६ रोजी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.त्यानुसार,राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने(NTA) वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘नीट यूजी-२०२६’ परीक्षेच्या नव्या तारखेची अधिकृत घोषणा केली आणि पुर्नपरीक्षा उद्या,रविवार २१ जून २०२६ रोजी पार पडणार आहे खरी,पण परीक्षेच्या पूर्वीच
नागपुरातील एका विद्यार्थ्याच्या बाबतीत नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा(एनटीए)एक खतरनाक कारनामा उघडकीस आला आहे.एनटीए परदेशातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी केंद्र देते.पण देशातील विद्यार्थ्याला थेट परदेशातील परीक्षा केंद्र दिल्याने पालक आणि विद्यार्थ्याची भंबेरी उडाली आहे.नीट पेपरफुटीच्या वादळानंतर परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि काळजीपूर्वक घेतली जात असल्याचा केंद्र सरकारचा दावा फोल ठरला आहे.
विशेष म्हणजे,राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपूरच्या ‘अब्दुल्लाह’ नावाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्याला उद्या,रविवार २१ जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी थेट संयुक्त अरब अमिरात या देशातील अबूधाबी(यूएई)येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा अवघ्या एका दिवसावर आली असतांना थेट घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालक प्रचंड चिंतेत आहेत.यापूर्वी त्याला नागपूरमध्येच केंद्र मिळाले होते.अब्दुल्लाहने अर्जात परीक्षा केंद्रासाठी नागपूर,वर्धा आणि भंडारा हे स्थानिक पर्याय निवडले होते.मात्र, एनटीएने या सर्व पर्यायांना केराची टोपली दाखवत त्याला थेट परदेशातील केंद्र दिले.या गोंधळानंतर पालकांनी तातडीने एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी आपली तांत्रिक चूक मान्य केली असून, पडताळणीअंती आज सुधारित प्रवेशपत्र देण्यात येईल,असे आश्वासन दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!