- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल ९० लाख ८५ हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १ हजार ८१७ कोटीची रक्कम जमा झाल्याचे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी म्हटले.शनिवार २० जून रोजी
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भरणे कार्यक्रमात सहभागी झाले होते.केंद्राने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना सुरू केली आहे.अश्यातच पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालच्या हुगळीतील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला.पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दोन हजार रुपये प्रमाणे थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होते. खात्यात २३ वा हप्ता थेट जमा झाल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्यात पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत २२ हप्त्यांद्वारे ४१ हजार ८३ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
- Advertisement -

