Friday, May 29, 2026
Homeभंडारारस्ता भटकल्या अन् गावात पोहचल्या; मुले पळविणाऱ्या समजून शेकडो लोकं झाले गोळा

रस्ता भटकल्या अन् गावात पोहचल्या; मुले पळविणाऱ्या समजून शेकडो लोकं झाले गोळा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मुले चोरणाऱ्या टोळीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.नुकतेच १ मार्च २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील रेल्वे स्टेशन परिसरातून साडेतीन वर्षाच्या बालकाची चोरी करून त्याची साडेतीन लाखात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.प्रकरणी पाच आरोपी महिलांना तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली होती.यामुळे परिसरात एखादा अनोळखी इसम वा महिला भटकंती करतांना दिसून येताच नागरिकांचा पारा चढू लागला आहे.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एकोडी गाव परिसरात दोन दिवसांपूर्वी दोन महिलांना संशयास्पद स्थितीत फिरतांना पाहून नागरिकांचा पारा चढला आणि मुले पळविणाऱ्या म्हणून परिसरात अफवा पसरली.बघता-बघता शेकडो लोकांची गर्दी झाली.विशेष म्हणजे,दोन्ही महिलांची भाषा स्थानिक नागरिकांना समजत नसल्याने संशय आणखीनच बळावला व महिलांना बदडणार,तितक्यातच जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे यांनी तातडीने एकोडी पोलिस चौकीचे पोलीस कर्मचारी वैरागडे आणि साकोली पोलीस ठाण्याचे स्वप्निल गोस्वामी यांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही महिलांना आपल्या संरक्षणात साकोली पोलीस ठाण्यात नेले.तिथे केलेल्या सखोल चौकशीतअनिता चंदुलाल मोहारे व लक्ष्मी मोहारे रा.किंडगीपार-डोंगरगाव,जि.गोंदिया अशी महिलांची नावे असून त्या मानसिकदृष्ट्या काहीशा अस्वस्थ असल्याने रस्ता भरकटून परिसरात आल्या होत्या.त्या कोणत्याही गुन्हेगारी टोळीतील नसल्याचे निष्पन्न झाल्याने साकोली पोलिसांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पोलिस वाहनाने त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या घरी पोहोचविल्याने मोठा अनर्थ टळला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या...

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!