Wednesday, July 8, 2026
Homeभंडारातरुणाची हत्या; चार अल्पवयीन मुले अटकेत..

तरुणाची हत्या; चार अल्पवयीन मुले अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहराच्या पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जलाराम चौक परिसरात काल शुक्रवारच्या मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ माजली.कार्तिक विलास भंडारी वय २८ वर्षे,रा.संताजी वॉर्ड,भंडारा असे हत्या झालेल्या मृतक तरुणाचे नाव आहे.तर प्रकरणातील  आरोपी हे अल्पवयीन असून पोलिसांनी काही तासांतच चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन  त्यांच्यावर कलम १०३ (१),१८९(४),१९०,१९१(२) व १९१(३)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी व पथकाने केली. आरोपींनी भंडारा शहराच्या जलाराम चौक परिसरात जुन्या वादातून कार्तिक भंडारी याचेवर धारदार शस्त्रांसह लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.या हल्ल्यात कार्तिक गंभीर जखमी झाला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कार्तिकला नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!