- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-सध्या स्थितीत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे फोफावली आहेत. ‘चट मंगणी पट ब्याह ‘ प्रमाणे कमी वेळात झटपट श्रीमंतीचे स्वप्न पाहणाऱ्यांची या जगात कुठेही कमी नाही.त्यामुळे काही अपवाद वगळता ४० टक्के लोक अवैध धंद्यांना पसंती देऊ लागले आहेत.अशातच नवा कारभार नवे विचार सुरुवातीला ठीक असतात.नंतर मात्र ‘चलता है चलणे दो’ असे प्रकार उघडकीस येतात.त्यातच भंडारा जिल्ह्याच्या साकोली ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार आल्या-आल्या एका मराठी दैनिक वृत्तपत्राशी संवाद साधतांना साकोली क्षेत्रात अवैध धंदे चालणार नाहीत व चालूही देणार नाही.दिसल्यास जनतेने तात्काळ पोलिस हेल्पलाईन ०७१८६-२३६१३३ वर कळवा,असे आवाहन जनतेला करीत महादेव आचरेकर यांनी अवैध व्यावसायिकांना सज्जड इशारा देत तंबी दिली आहे.अवैध व्यवसायात युवा,तरुण पिढी गुरफटली जाऊ नये,तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व जनतेंनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे; असे ठाणेदार आचरेकर यांनी म्हटले आहे.त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांची आता खैर नाही.
- Advertisement -

