- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केल्याने काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मार्च महिन्यापासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका अधिक जाणवत असल्याने लहान मुले,वृद्ध आणि कामगार वर्गाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.त्याचबरोबर,विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उद्या,शनिवार १८ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.अश्यातच हवामानाचा आढावा घेऊन गरज भासल्यास पुढील काही दिवस आणखी निर्णय घेतले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.कुमार आशीर्वाद यांनी नुकताच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.यापूर्वी ते सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.तत्पूर्वी ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.हे विशेष.
- Advertisement -

