Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीबालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. - ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या दिवशी कुठल्याही प्रकारचा बालविवाह झाल्यास संबंधितांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत.
बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने सविस्तर ॲक्शन प्लॅन तयार केला असून ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ)यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.या अधिकाऱ्यांकडून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
बालविवाहात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये विवाह सोहळ्यात सेवा देणारे पंडित,धार्मिक गुरु,मंडप मालक,फोटोग्राफर,केटरिंग व्यवसायिक, लॉन्स मालक तसेच वाजंत्री यांचा समावेश असून, बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या कक्षेत आणले जाईल,असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा शुभ मुहूर्त मानला जातो.या दिवशी मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडत असल्याने काही ठिकाणी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता असते.याची दखल घेत प्रशासनाने या वर्षी विशेष खबरदारी घेतली असून जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये,यासाठी सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.
बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून,कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.प्राप्त माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून त्वरित कारवाई केली जाईल.
दरम्यान,मागील सहा वर्षांत राज्यात प्रशासनाने ५ हजार ४२१ बालविवाह थांबवले असून ४०१ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने आतापर्यंत १७ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असून बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६(१)नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.जिल्ह्यात बालविवाहमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून नागरिकांनीही या सामाजिक प्रश्नाविरुद्ध सजग राहून सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!