- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा सण पोळा व त्याचे पाठोपाठ महाराष्ट्राचा प्रमुख उत्सव गणेश चतुर्थी सह ईद मिलाद उन्नबी हे मोठे सण साजरे करण्यात येणार आहेत.संवैधानिक तरतुदी नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे. मात्र तो कायद्याच्या चौकटीत राहुनच साजरा करावा,असे आवाहन गडचिरोली पोलिस दलाचे अप्पर पोलिस अधिक्षक गोकुलदास जी.यांनी देसाईगंज पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित शांतता व सुव्यवस्था बैठकीच्या माध्यमातुन केले.
देसाईगंज पोलिस स्टेशनच्या वतीने काल,बुधवारी स्थानिक नगर परिषद सांस्कृतिक भवनात देसाईगंज तालुक्यातील सर्व गणेश मंडळ,पोलिस पाटिल व इतर समाज बांधवांची शांतता व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी गडचिरोली पोलिस दलाचे अप्पर पोलिस अधिक्षक गोकुलदास जी.,कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रविन्द्र भोसले,देसाईगंज ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजय जगताप,पोलीस उपनिरीक्षक मनिष गोडबोले,पोलीस उपनिरीक्षक दांडेकर,पोलीस उपनिरिक्षक उदयभान जांभुळकर यांचेसह देसाईगंज पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य पोलिस पाटिल व इतर नागरिकांना बैलपोळा, गणेशउत्सव व ईद मिलाद उन्नबी या उत्सवा संबंधी मार्गदर्शन करतांना अप्पर पोलीस अधिक्षक गोकुळदास जी.म्हणाले की,भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार सण उत्सव साजरा करण्याचा संवैधानिक अधिकार दिला असला तरी देशातील काही असामाजिक तत्वांकडुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या कालावधित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचा महत्वाचा सण पोळा त्या पाठोपाठ गणेश चतुर्थी व इद मिलाद उन्नबी हे सण येत असुन देसाईगंज तालुक्यात एकुण ६२ गणेश मंडळे, शहरात १८ गणेश मंडळे उत्सव साजरा करतात.त्या पाठोपाठ १५ गावांत एकगाव एक गणपती ही संकल्पना राबविली जाते.ही अतिशय गौरवाची बाब असुन घटस्थापनेपासुन ते विसर्जन पर्यंत सर्व गणेश मंडळांना जाहिराती फ्लेक्स लावणे, ध्वणिक्षेपणाचा आवाजाची मर्यादा,विद्युत कनेक्शन पुरवठा संबधी तसेच डिजे व परंपरागत वाद्य या सबंधाने इत्यंभूत माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहे.तसेच ईद मिलाद उन्नबी च्या रॅली संबंधाने मार्गक्रमणाची माहितीही प्रदान करण्यात येणार आहे.हिंदु व मुस्लिम अश्या समाजाचे सण एकाच वेळेत येत असल्याने सर्व धर्मिय बांधवांनी धार्मिक सौहार्द टिकवुन ठेवण्यासाठी कायदेशिररित्या दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सण,उत्सव साजरा करावा,असेही आवाहन या प्रसंगी केले.
- Advertisement -

