- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-साहित्य माझे जीवन समूहात वर्धापन दिनानिमित्त सलग दहा दिवस विविध प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावर चारोळी,आठोळी,लाडू काव्य लेखन स्पर्धा घेण्यात आली होती.त्यात दहाही स्पर्धेत भंडारा येशील सुप्रसिद्ध कवयित्री हर्षा भुरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावले होते.त्यानंतर त्यांना डाकेने घरपोच सन्मान चिन्ह पाठवून सन्मानित करण्यात आले आहे.इतकेच नाही तर शिवसेना अध्यक्ष आशाताई गायधने भंडारा यांच्या हस्ते विद्यानगर येथील शिव गणेश मंदिरात सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे.
भंडारा येथील सुप्रसिद्ध कवयित्री हर्षा भुरे यांनी विश्व लेखकांचे साहित्य समूहात देखील द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्यलेखन,अलक लेखन,लेख लेखन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यात काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे मानांकन मिळवून गुणगौरव करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात हर्षा भुरे यांचे कौतुक केले जात आहे.
साहित्य माझे जीवन समूहात काव्यसम्राज्ञी पुरस्कार व विश्व लेखकांचे साहित्य मंच समूहात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांना घरपोच सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले आहे.हर्षा भुरे यांनी साहित्य क्षेत्रात लाडू काव्य प्रकार निर्मिती म्हणून ख्याती मिळविली असल्याने साहित्य माझे जीवन समूहाचे संस्थापक कवी अजय राऊत,संचालिका कवयित्री शुभांगी डांगरे नागपूर यांनी अभिनंदन केले.
- Advertisement -

