Wednesday, June 24, 2026
Homeभंडारासरपंचपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर प्रकरणी महिला सरपंचा अपात्र...

सरपंचपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर प्रकरणी महिला सरपंचा अपात्र…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सरपंचपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून लाखांदूर तालुक्याच्या
दिघोरी मोठी येथील महिला सरपंचाला अपात्र घोषित करण्यात आले.सदरची कारवाई नागपूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशावरून करण्यात आली. सुनीता संजय साळवे असे अपात्र महिला सरपंचाचे नाव आहे.
२०२३ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत तहसीलच्या दिघोरी/मो. ग्रामपंचायतमध्ये सुनीता साळवे यांना थेट जनतेने सरपंचपदासाठी निवडून दिले होते.तर इतर १२ जण ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून निवडून आले होते. एकंदरीत सरपंचासह १३ गावातील अधिकारी गेल्या वर्षभरापासून गावाचा कारभार बिनविरोध चालवत होते.गेल्या काही महिन्यांपासून सदस्यांची मान्यता न घेता स्वतःच्या मर्जीने कारभार करण्याचा आरोप करीत उपसरपंच व इतर सदस्यांनी याप्रकरणी नागपूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करून महिला सरपंचाला सदस्यपदावरून अपात्र ठरवावे,अशी मागणी केली होती.त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले.या आरोपांसह भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांनी महिला सरपंचाला नियमबाह्य काम करण्यासह कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी ठरविले.त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी महिला सरपंचाविरुद्ध आदेश काढून त्यांना सदस्यपदासह सरपंचपदावरून अपात्र घोषित केले.विद्यमान महिला सरपंचाला अपात्र घोषित करण्यात आले आहे.या स्थितीत रिक्त असलेला पदभार विद्यमान उपसरपंच विजय खोब्रागडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!