- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील दोन जिवलग मित्रांचा दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील विरशी फाट्यानजीक तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर घडली.अपघातात १९ वर्षीय यश राजेश उईके व १८ वर्षीय भारत भगवान बनकर या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला.दोघेही भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रहिवासी होते,तर तुमसर येथील सातपुडा आयटीआयचे(औद्योगिक प्रशिक्षण संस्था)विद्यार्थी होते.
माहितीनुसार,यश व त्याचा जीवलग मित्र भारत हे दोघेही काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास एमएच३६ एपी ६४५४ क्रमांकाच्या दुचाकीने त्यांच्या स्वगावाहून दवनीवाडा येथील मावशीकडे यशचे स्वेटर आणण्यासाठी निघाले होते.दरम्यान विरशी फाट्याजवळ दुसऱ्या साईडने येणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकी वाहन आपटले.यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे,काल शुक्रवारी दोघेही मित्र उज्जैन येथील महाकालच्या देव दर्शनासाठी जाणार होते.तत्पूर्वी मावशीकडे विसरलेले स्वेटर आणण्यासाठी गेले असता दोन्ही जिवलग मित्रांवर काळाने झडप घालून कुटुंबियांवर मोठा आघात केला आहे.
- Advertisement -

