- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-तांदळाची खरेदी-विक्री करतांना परवाना आवश्यक आहे.त्याचबरोबर,परवानाधारक व्यापाऱ्यांकडे खरेदी-विक्री रजिस्टर,विक्रेत्यांची यादी,साठ्याची नोंद, साठ्यासाठी स्वतंत्र स्टॉक परवाना व नोंदणीकृत गोदाम असणे बंधनकारक आहे.मात्र,काहीजणांकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसतांना तांदळाची खरेदी करून विक्रीसाठी अवैधपणे वाहतूक करतांना दिसून येतात. असाच धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी शहरात दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे.प्रकरणी पोलिसांनी तब्बल २०० क्विंटल तांदळाची अवैध वाहतूक सुरू असतांना तांदूळ भरलेला ट्रक जप्त केला असून आज,गुरुवार २९ जानेवारी रोजी चौकशी करून दोषी आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करू,असे गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी म्हटले आहे.प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेला तांदूळ हा गोंडपिपरीतील व्यावसायिक पौणिमा चापले यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रकरणी पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असून तांदळाच्या खरेदी-विक्री संबंधी कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.जप्त केलेला तांदूळ रेशन दुकानातून अपहार करून काळाबाजारासाठी नेला जात होता कां?याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

