Tuesday, June 2, 2026
Homeचंद्रपूररेतीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा हुक काढत असतांनाच अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू..

रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा हुक काढत असतांनाच अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-बांधकामासाठी ट्रॅक्टरद्वारे आणलेली रेती खाली करण्यासाठी ट्रॉलीचा मागील हुक काढत असतांनाच घडलेल्या अपघातात एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २ जून रोजी सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्याच्या सामदा गावात घडली.धीरज भास्कर बोरकर वय २३ वर्षे, रा.टेकरी,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
सामदा गावातील गुलाब नाथ यांच्या घरानजीक बांधकामासाठी रेती लागत असल्याने धीरज बोरकर व त्याच्या सहकाऱ्याने ट्रॅक्टरद्वारे रेती आणली होती.रेती खाली करण्यासाठी धीरज ट्रॉलीचा मागील हुक काढायला गेला.हुक काढत असतांनाच ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मागे सरकला आणि तो त्यात दबला गेला.यात धीरजच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवला.घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंघोळ करण्यासाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडाला.. – शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रहपुरी शहराच्या जानी वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय शाळकरी मुलाचा आंघोळीसाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

अखेर शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाखाहून अधिकच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार...

आता फसव्या जाहिराती करणाऱ्या हिरो-हिरोईनवरही होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  आयुक्तपदी सोमवार,२५ मे २०२६ रोजी राज्यातील धडाधडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे विराजमान होताच मुंढे यांनी कारवाईचा...

राज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्यामागचे खरे कारण आले समोर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यावर आलेल्या आर्थिक संकटामुळे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे कपात करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.पण,सरकारने स्पष्ट केले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!