Tuesday, June 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्यामागचे खरे कारण आले समोर..

राज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्यामागचे खरे कारण आले समोर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यावर आलेल्या आर्थिक संकटामुळे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे कपात करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.पण,सरकारने स्पष्ट केले आहे की योजनेसाठी निधी कमी पडलेला नाही. योजनेतील लाभार्थ्यांच्या छाननीनंतर पात्र ठरलेल्या कोट्यवधी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे नियमितपणे जमा होत आहेत.त्यामुळे योजना बंद झालेली नाही किंवा आर्थिक टंचाईमुळे त्यात कपात केलेली नाही.त्यातच,८० लाख महिलांची नावे आर्थिक संकटामुळे वगळली गेलेली नाहीत,तर कागदपत्रांमधील त्रुटी आणि अपात्रतेमुळे त्यांचे अर्ज बाद झाले आहेत.पात्र महिलांसाठी ही योजना पूर्ववत सुरू आहे.याबाबत राज्य सरकारच्या डीजीआयपीआर(DGIPR)या एक्स(ट्विटर)हँडलवर लाडकी बहीण योजनेवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ८० लाख लाभार्थ्यांची नावे राज्यावरील आर्थिक संकटामुळे वगळण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सांगण्यात आले आहे.लाभार्थ्यांची संख्या कमी होण्यामागे अनिवार्य ई-केवायसी पडताळणी आणि पात्रता तपासणी प्रक्रिया कारणीभूत असून योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही प्रस्ताव नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे.योजनेतून ८० लाख महिलांना अचानक काढून टाकलेले नाही.सरकारने जेव्हा अर्जांची छाननी केली,तेव्हा सुमारे ८० लाख अर्ज अपात्र आढळले.त्याची कारणेही समोर आली आहेत.विशेष म्हणजे,एकाच महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांचा किंवा मोबाईल नंबरचा वापर करून एकापेक्षा जास्त अर्ज भरणे.चारकी वाहन असूनही खोटी माहिती देणे. अर्जदाराचे वय २१ ते ६५ वर्षांच्या मर्यादेत नसणे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणे.तसेच बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे किंवा थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया सक्रिय नसणे. सदरची कारणे अपात्रतेस कारणीभूत असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळेच राज्यातील तब्बल ८० लाख लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंघोळ करण्यासाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडाला.. – शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रहपुरी शहराच्या जानी वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय शाळकरी मुलाचा आंघोळीसाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

अखेर शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाखाहून अधिकच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार...

आता फसव्या जाहिराती करणाऱ्या हिरो-हिरोईनवरही होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  आयुक्तपदी सोमवार,२५ मे २०२६ रोजी राज्यातील धडाधडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे विराजमान होताच मुंढे यांनी कारवाईचा...

हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढणारी बातमी; गॅस सिलेंडर आणखी झाला महाग..

उद्रेक न्युज वृत्त :-हॉटेल व्यावसायिकांसाठी केवळ चिंता वाढणारीच बातमी नाही,तर त्यांच्या व्यवसायावर तसेच आर्थिक बाबींवर महागाईचा दबाव वाढून कंबरडे मोडण्याचा खेळ सुरू झाल्याचे चित्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!