Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; ...अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार १ ऑगस्ट २०२६ पासून सदरचे कार्ड बस प्रवासासाठी अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र,महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रवाशांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे,राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रवासातील विविध सवलतींसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.यामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणारी ५० टक्के सवलत,६५ ते ७५ वयोगटातील नागरिकांना मिळणारी ५० टक्के सूट आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील वृद्धांसाठी असणारा शंभर टक्के मोफत प्रवास यांचा समावेश आहे. याशिवाय,शालेय विद्यार्थ्यांचा ६६.७६ टक्के सवलतीचा मासिक पास तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणारा मोफत पास यांसाठीही एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक राहील.
“एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे.तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये,ही आमची भूमिका आहे.त्यामुळे एनसीएमसी (NCMC)स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले.दिलेल्या मुदतवाढीमुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक,ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळाच्या सवलतींचा गैरवापर थांबवणे आणि संपूर्ण प्रवास प्रणाली अधिक तंत्रज्ञान-आधारित व पारदर्शक करणे हा या एनसीएमसी स्मार्ट कार्डचा मुख्य उद्देश आहे.या कार्डच्या अमलबजावणीनंतर कागदी पास पूर्णपणे बंद होऊन कॅशलेस तिकीट सिस्टीम लागू केली जाईल.येत्या,१ सप्टेंबर २०२६ नंतर ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल,त्यांना एसटी प्रवासात दिली जाणारी सवलत मिळणार नसून पूर्ण भाडे देऊनच तिकीट काढावे लागेल.यासाठी पात्र प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट काढणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!