- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्यात अचानकपणे मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसून येतात.जिल्ह्यातील आमदार असोत वा खासदार असोत ते नेहमी चर्चेत तर असतातच,पण एखादा ॲक्शन करतोय म्हटले तर प्रत्यक्षात कृतीही करून दाखवतात.अश्यातच दिवाळी सणानिमित्त आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेत मागील काही वर्षांपासून २० टक्के कमिशनशिवाय कोणतेही काम होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.एवढेच नव्हे,तर चार वर्षाच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.एका नेत्याने २० कोटींच्या कामात २० टक्के कमिशन ठेवले होते.मात्र,सदरची कामे तात्काळ थांबविण्यात आली.कामांना कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता वा इतर ठराविक बाबी नसतांनाही पोळी शेकली जात होती.नगर परिषदेत पुन्हा भाजपची सत्ता आली,तर सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात येईल,असाही इशारा परिणय फुके यांनी दिल्याने चक्क आपल्याच सरकारवर भाजप नेते प्रश्न उपस्थित करत आहेत; अशा शब्दांत टीकाकारांनीही हल्ला चढवला आहे.दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार परिणय फुके यांनी भंडारा नगर परिषदेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवल्याने सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी चुप्पी साधली आहे.
- Advertisement -

