- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने उष्माघात(सन स्ट्रोक)व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११ वाजेपर्यंतच सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले आहेत.यात शासकीय,अनुदानित,खासगी शाळा व महाविद्यालयांचा समावेश असून या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

