- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वनिता नाकतोडे यांच्या वाढत्या जनसमर्थनामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रचारमोहीमेचा वेग वाढला असून विविध प्रभागांमधून मिळणारा प्रतिसाद हा काँग्रेससाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.स्थानिक नागरिक, महिला बचतगट,युवक संघटना आणि व्यापारी वर्गांकडून नाकतोडे यांना भरघोस पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. “शहरातील मूलभूत सुविधांचा विकास, स्वच्छता व्यवस्था,पाणीपुरवठा आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण यावर आम्ही ठोस काम करू,” असे आश्वासन नाकतोडे यांनी नुकत्याच घेतलेल्या सभेत दिले.त्यांच्या या भूमिकेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.काँग्रेसच्या गोटातही उमेदवाराच्या या वाढत्या ग्राफमुळे नवीन जोश निर्माण झाला आहे.पक्षातील कार्यकर्ते घराघरांमध्ये संपर्क मोहीम राबवत असून, नाकतोडे यांचे व्यक्तिमत्त्व,त्यांची कार्यशैली आणि स्थानिक प्रश्नांविषयीची जाणीव ही त्यांची मुख्य ताकद असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे.दुसरीकडे,शहरातील सर्वसामान्य मतदारही बदल, विकास आणि स्वच्छ प्रशासनाच्या अपेक्षांवर भर देत आहेत. “प्रामाणिक नेतृत्व आणि व्यवहार्य विकास योजना असलेला उमेदवार आम्हाला हवा आहे,” असे अनेक मतदार सांगत आहेत. त्यामुळे वनिता नाकतोडे यांच्या नावाला मिळणारा वाढता प्रतिसाद हा आजच्या घडीला चर्चेचा विषय ठरत आहे.निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय समीकरणे आणखी स्पष्ट होतील.मात्र, सध्याच्या वातावरणावर नजर टाकल्यास काँग्रेसच्या वनिता नाकतोडे या नगर परिषद निवडणुकीत महत्त्वाच्या दावेदार म्हणून पुढे येतांना दिसून येत आहेत.
- Advertisement -

