- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-प्रत्येक अधिकाऱ्याने राजकीय पुढाऱ्यांच्या प्रभावीखाली असावे,असा आजघडीचा शिरस्ता आहे. जे अधिकारी राजकारण्यांना जुमानत नाही,त्यांना बदलीचा रस्ता दाखविला जातो; अशी चर्चा खुद्द अधिकारी वर्गात नेहमीच असते.राजकारण्यांच्या प्रत्येक ‘हो’ ला ‘हो’ मिळविणारा टिकतो,अन्यथा बदली होते,असा सार्वत्रिक समज आहे.भंडारा जिल्ह्यात राजकीय त्रास अधिक आहे की हा जिल्हाच अधिकाऱ्यांना नको आहे,अशी दोन्ही बाजूने आता चर्चा सुरू झाली आहे.भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांची काल मंगळवारी बदली झाली.त्यांच्या जागी आता नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,जिल्ह्याला गेल्या दहा वर्षांत दहा जिल्हाधिकारी मिळालेत.यामुळे भंडारा जिल्ह्यात राजकीय त्रास अधिक आहे की, हा जिल्हाच अधिकाऱ्यांना नको आहे,अशी चर्चा आता सुरू झाली आहे.जिल्हाधिकारी पद हे सुमारे तीन वर्ष कालावधीचे असते.मात्र,भंडारा जिल्हा यास अपवाद ठरतो आहे.येथे बदली झाली की वर्ष-दीड वर्षच राहायचे बापू अन् उडून जायचे,असा संदेशच जणूकाही कक्षातील फलकावरच नोंदवल्या गेला की काय? अश्या चर्चांना उधाण आले आहे.भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांची ५ सप्टेंबर २०२४ रोजी नियुक्ती झाली होती.अश्यातच वर्ष होण्यापूर्वीच त्यांची बदली झाल्याने ‘आम्ही करू ती पूर्व दिशा’ असा प्रकार सर्वांच्या मुखी पडू लागला आहे.
- Advertisement -

