Monday, May 25, 2026
Homeभंडाराजे अधिकारी राजकारण्यांना जुमानत नाही; त्यांना बदलीचा रस्ता..!

जे अधिकारी राजकारण्यांना जुमानत नाही; त्यांना बदलीचा रस्ता..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-प्रत्येक अधिकाऱ्याने राजकीय पुढाऱ्यांच्या प्रभावीखाली असावे,असा आजघडीचा शिरस्ता आहे. जे अधिकारी राजकारण्यांना जुमानत नाही,त्यांना बदलीचा रस्ता दाखविला जातो; अशी चर्चा खुद्द अधिकारी वर्गात नेहमीच असते.राजकारण्यांच्या प्रत्येक ‘हो’ ला ‘हो’ मिळविणारा टिकतो,अन्यथा बदली होते,असा सार्वत्रिक समज आहे.भंडारा जिल्ह्यात राजकीय त्रास अधिक आहे की हा जिल्हाच अधिकाऱ्यांना नको आहे,अशी दोन्ही बाजूने आता चर्चा सुरू झाली आहे.भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांची काल मंगळवारी बदली झाली.त्यांच्या जागी आता नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,जिल्ह्याला गेल्या दहा वर्षांत दहा जिल्हाधिकारी मिळालेत.यामुळे भंडारा जिल्ह्यात राजकीय त्रास अधिक आहे की, हा जिल्हाच अधिकाऱ्यांना नको आहे,अशी चर्चा आता सुरू झाली आहे.जिल्हाधिकारी पद हे सुमारे तीन वर्ष कालावधीचे असते.मात्र,भंडारा जिल्हा यास अपवाद ठरतो आहे.येथे बदली झाली की वर्ष-दीड वर्षच राहायचे बापू अन् उडून जायचे,असा संदेशच जणूकाही कक्षातील फलकावरच नोंदवल्या गेला की काय? अश्या चर्चांना उधाण आले आहे.भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांची ५ सप्टेंबर २०२४ रोजी नियुक्ती झाली होती.अश्यातच वर्ष होण्यापूर्वीच त्यांची बदली झाल्याने ‘आम्ही करू ती पूर्व दिशा’ असा प्रकार सर्वांच्या मुखी पडू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!