Wednesday, June 24, 2026
Homeचंद्रपूरकाळजाला हेलावणारी घटना.. आईला हृदयविकाराचा झटका; आईचा मृतदेह पाहून मुलीनेही घेतला गळफास..

काळजाला हेलावणारी घटना.. आईला हृदयविकाराचा झटका; आईचा मृतदेह पाहून मुलीनेही घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-हृदयविकाराच्या धक्क्याने आईचा अचानक मृत्यू झाल्याने शोकाकुल अल्पवयीन लेकीने खोलीची आतील कडी लावून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल,रविवारी १७ नोव्हेंबरच्या पहाटे उघडकीस आली.गायत्री श्रीनिवास कादासी वय १६ वर्षे रा.रामनगर असे मृतक मुलीचे नाव आहे.
घुग्घुस येथील रामनगर वेकोलि वसाहतीत श्रीनिवास कादासी यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.कादासी यांच्या पत्नी तिरुमला वय ४२ वर्षे हिला शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला.झटका आल्याने
वेकोलिच्या राजीव रतन रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूरला नेत असताना रात्री १.३० वाजता तिचा वाटेतच मृत्यू झाला.आईचा मृतदेह घरी आणल्याचे पाहून मुलगी गायत्रीने हंबरडा फोडला.कुटुंबीय व नातेवाइकांनी तिला धीर देत घरातील खोलीत आराम करण्यास नेले. सोबतचे नातेवाईक खोलीतून बाहेर निघाल्यानंतर गायत्रीने आतून कडी लावून घेतली.शोकाकुल सर्व कुटुंबीय रात्रभर मृतदेहाशेजारी जागरण करीत होते.
गायत्री खोलीत झोपी गेली असावी,असा सर्वांचा समज झाला.त्यामुळे कुणीही तिला रात्री उठविण्याचा प्रयत्न केला नाही.पहाटे ४.३०च्या सुमारास दार ठोठावले असता प्रतिसादच मिळाला नाही.त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी दार खोलून पाहिले असतांना गायत्रीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला.घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!