Sunday, June 21, 2026
Homeचंद्रपूरशेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी(बा.)वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील नागभीड तालुक्याच्या गिरगाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे,रा.गिरगाव,ता.नागभीड या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.सदरची घटना ही शुक्रवार १९ जून २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.अश्यातच वनविभागाने तातडीने पावले उचलत परिसरात कडक सतर्कता उपाययोजना सुरू केल्या आहेत.वाघाच्या हालचालींचा अचूक मागोवा घेण्यासाठी वनविभागाने जंगल परिसरात आठ ट्रॅप कॅमेरे आणि एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे.या माध्यमातून वाघाच्या उपस्थितीची माहिती मिळवून त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.तसेच जंगलालगतच्या संवेदनशील भागांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर.कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक,क्षेत्र सहाय्यक आणि वनमजूरांची पथके परिसरात सतत गस्त घालत आहेत. जंगल परिसर तसेच शेतशिवारात नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वनविभागाने गावकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य...

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!