Tuesday, April 22, 2025
Homeदेसाईगंजरोजगार सेवकांची रंगपंचमी अंधारात; चार महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत.. - दीपक प्रधान यांची...
spot_img

रोजगार सेवकांची रंगपंचमी अंधारात; चार महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत.. – दीपक प्रधान यांची मानधन उपलब्ध करून देण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने रोजगार सेवकांवर उपासमारीची पाळी आली आहे.कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करावा,असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने तातडीने ग्राम रोजगार सेवकांचे मानधन उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी ग्राम रोजगार सेवक संघटनेचे देसाईगंज तालुकाध्यक्ष दीपक प्रधान यांनी केली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम विकासाची विविध कामे,गावातील मजुरांना रोजगार,शासनाच्या योजनेची अंमलबजावणी आणि ग्रामपंचायतीत रोजगार निर्माण करणे अशी महत्त्वाची जबाबदारी रोजगार सेवक पार पाडतात.मात्र, तुटपुंज्या मानधनात काम करूनही,वेळेवर मानधन दिले जात नाही.गत अनेक वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित होत्या.त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून रोजगार सेवकांनी सातत्याने मोर्चे,आंदोलन करीत शासनाचे उंबरठे झिजविले.अखेर ऑक्टोंबर महिन्यामध्ये राज्य सरकारने ग्राम रोजगार सेवकांना ८ हजार रुपये मानधन,तर दोन हजार रुपये प्रवास भत्ता देण्याची घोषणा केली.मात्र,पाच महिने लोटूनही रोजगार सेवकांना मानधन मिळाले नसल्याने मानधन तर वाढविले,पण मिळणार कधी? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
राज्यामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीमध्ये २००८ मध्ये ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली.सुरुवातीच्या काळात ग्रामरोजगार सेवकांना तुटपुंजे मानधन देण्यात येत होते.परंतु,नंतर मागील दहा ते पंधरा वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील रोजगार सेवकांनी तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला.अशातच प्रदीर्घ लढा लढल्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोंबर २०२४ मध्ये राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रवास भत्ता देण्याची घोषणा केली. अशातच अजून पर्यंत मानधन तर वाढविले,पण मिळणार कधी? अशी अवस्था झाली आहे.एकीकडे शासन स्तरावरून रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा जीआर काढला जातो व केलेल्या कामाचा मोबदलाही वेळेवर मिळत नसल्याने शासनाचा वेळ काढूपणा धोरण आणि प्रशासकीय असमतोलामुळे, शासन ग्राम रोजगार सेवकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाची जबर धडक; चौघांचा दुर्दैवी मृत्यू…

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी गावानजिक रामनगरजवळ सोमवारच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा...

अखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रतीक्षा संपली.. – मजुरीचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी...

वाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सर्वत्र वाळू चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत असतांनाच शासनाकडून वारंवार वाळू धोरणात बदल करण्यात येत आहे.अशातच नुकतेच राज्य शासनाने वाळूचे नवे धोरण...

दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाची बापाने केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांसह,युवक, वयोवृध्द दारूच्या आहारी जाऊन स्वतःची तसेच कुटुंबाची बर्बादी करू लागले आहेत.काहीजण दारू ढोसून आपल्याच घरच्यांना त्रास देऊ लागले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!