Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजमहाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या बोगस औषधी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा......

महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या बोगस औषधी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा… – शिवसेना उबाठाचे डॉ.श्रीकांत बनसोड यांची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील तसेच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी होत असलेल्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस औषधांचा पुरवठा आणि साठा आढळून आल्याची बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. गोरगरीब रुग्णांच्या सेवेत शासकीय रुग्णालयाद्वारे गोरगरीब रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात औषधे मिळावी या उद्देशाने शासकीय रुग्णालयात औषधांचा वाटप केला जातो.परंतु अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात तसेच नागपूरच्या रुग्णालयामध्ये बोगस औषधांचा पुरवठा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.बोगस औषधांच्या वाटपामध्ये गुजरात येथील व कोल्हापूर येथील काही कंपन्यांचे नाव समोर आले असून त्यांनी पुरवठा केलेल्या औषधांमध्ये योग्य प्रमाणात औषधांचे कंटेंट नसल्याचे व गुणवत्ता शून्य असल्याचे निदर्शनात आल्याने,अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे.सोशल मीडियातून सुध्या महाराष्ट्रात जिल्हा सामान्य रुग्णालयातील विषारी औषध साठा ह्या सदराखाली बातम्या प्रसिद्ध झाल्याने,गडचिरोली जिल्ह्यातील गोर-गरीब आदिवासी रुग्ण पुरते धास्तावलेले असून,शासकिय रुग्णालयातील सेवेला आणि औषधांना घाबरत असून त्याचा वापर करताना शंकांना पेव फुटलेला आहे. अशातच अन्न व औषध प्रशासन व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून केवळ या दोन तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सदरच्या कंपन्यांकडून औषध साठा पुरवठा झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरच्या बोगस औषधांच्या वापराने आणि सेवनाने ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेच्या आरोग्याचा मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलेला आहे.बोगस औषध देऊन रुग्णांची बोळवन करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनात येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये संपूर्ण जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब जनता लाभ घेत असल्याने गडचिरोली जिल्ह्यामध्ये या कंपन्यांकडून सदर बोगस औषधांचा पुरवठा झाला किंवा नाही? झाला असल्यास नेमका त्याचा साठा किती आहे? याची समिती नेमून चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी; यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत बनसोड यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंजचे नायब तहसीलदार विलास तुपट यांना शिवसैनिकांसह निवेदन देत प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.सदर निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज तालुक्याचे उपतालुकाप्रमुख विलास ठाकरे, विभाग प्रमुख होमराज पाटील गायकवाड,वैद्यकीय आघाडीचे उपजिल्हा प्रमुख डॉ.मंडल सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!