Wednesday, June 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयेत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून,येत्या,२०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे.त्यानुसार,सर्व विद्यार्थ्यांच्या अधिकृत नोंदींमध्ये आता आईचे नाव प्रथम नमूद केले जाणार आहे.विशेष म्हणजे,यापूर्वी वडिलांचे नाव प्रथम राहायचे.मात्र,आता आईचे नाव,वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव असा नवीन क्रम निश्चित करण्यात आला आहे.हजेरीपत्रक,गुणपत्रक,शाळा सोडल्याचा दाखला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आणि शाळा सोडल्याचा  दाखला(प्रवेश निर्गम उतारा)या सर्व कागदपत्रांवर आईचे नाव नमूद केले जाईल.त्याचबरोबर, विभक्त-घटस्फोटित पालक व दत्तक मुलांच्या बाबतीत परिस्थितीनुसार योग्य ती नोंद ठेवण्याची तरतूद करण्यात येणार आहे.सदरचा नियम शासकीय,अनुदानित आणि खासगी या सर्व शाळांमध्ये एकसमान लागू होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एमडी ड्रग्स पावडर,घातक शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पोलीस गस्तीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी  काही संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेताच मोठा भांडाफोड होऊन कारवाईत एमडी(मेफेड्रोन)पावडर, घातक शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेले सोन्या-चांदीचे...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १८ जून...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!