- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळा गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार १४ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश असून त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या एका महिलेचाही मृत्यू झाला.समीक्षा उत्तम जाधव वय १६ वर्षे,उत्कर्षा उत्तम जाधव वय १८ वर्षे व सिंधू दत्ता जाधव वय ४५ वर्षे,अशी मृतकांची नावे असून तिघीही रा.मोहळा, ता.सोनपेठ,जि.परभणी येथील रहिवासी आहेत.या दुर्दैवी घटनेने मोहळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समीक्षा व तिची बहीण उत्कर्षा आज रविवारच्या सकाळी साडेसातच्या सुमारास मोहळा गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर आंघोळ करण्यासाठी गेल्या होत्या.आंघोळ करत असतांनाच समीक्षा व उत्कर्षा या दोघी पाण्यात बुडू लागल्या.बुडत असतांना आरडा-ओरड केल्याने सिंधू जाधव यांनी नदीत उडी मारून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र,त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने त्या देखील पाण्यात बुडाल्या.या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.काही वेळाच्या प्रयत्नानंतर तिघींचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर,मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.
- Advertisement -

