- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचे मनोबल वाढवले.राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते.मात्र,विदर्भातील वाढते उष्णतामान आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी यामुळे या भागातील शाळा उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे आली होती.या मागणीच्या अनुषंगाने काही शिक्षक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.त्यानुसार, उष्णतेचा कहर,विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश लक्षात घेता शिक्षण विभागाने सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षणाधिकारी (माध्यमिक)यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.त्यानुसार,आता नागपूर विभागातील नागपूर,
चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,वर्धा,तसेच अमरावती विभागातील अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा आणि वाशिम या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या शाळा ह्या येत्या,मंगळवार ३० जून २०२६ पासून सुरू होणार आहेत.
- Advertisement -

