- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या कोजबी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच चक्क दुर्गंधीयुक्त चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.अश्यातच गावातील जिल्हा परिषद शाळे समोरही हिच अवस्था असल्याने गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असतांना नजरेसमोर दिसूनही न दिसल्यासारखे केले जात असल्याने ग्रामपंचायत प्रशासन निद्रावस्थेत गेले की काय? अश्या संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यां उमटू लागल्या आहेत.दुर्गंधीयुक्त चिखलाच्या साम्राज्याने ग्रामस्थांचे तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील प्रमुख प्रशासकीय इमारतींसमोरच हा चिखल साचलेला असून,पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे.या चिखलातून विद्यार्थ्यांना शाळेत जातांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.चिखलातून वाट काढावी लागत असल्याने या ठिकाणाहून अनेकदा पाय घसरून अपघाताच्या घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे,ग्रामपंचायत कार्यालयासमोरच ही परिस्थिती असतांनाही प्रशासन डोळेझाक करत आहे.स्वच्छता,रस्त्यांची दुरुस्ती आणि पाणी निचरा ही ग्रामपंचायतची जबाबदारी असतांना यावर कोणतीही ठोस उपाययोजना अद्याप झालेली नाही.यावरून ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतो.स्थानिक नागरिकांनी या समस्येवर अनेकदा तक्रारी दाखल केल्या,निवेदने दिली,परंतु परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे असंतोषाचे वातावरण पसरले आहे.चिखलामुळे एखादे वाहन स्लीप होऊन मोठा अपघात घडल्यासच प्रशासनाला जाग येईल कां?असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.ग्रामपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करू,असा इशारा ग्रामस्थांनी दिला असल्याने ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- Advertisement -

