- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-दारूच्या आहारी गेलेल्या व सततचे भांडण करून कीटकीट लावणाऱ्या पतीचा रागाच्या भरात पत्नीने रुमालाने गळा आवळून वचपा काढल्याची घटना आज,रविवार १५ जून रोजी सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा (नवीन)येथे पहाटेच्या सुमारास घडली.दुर्वास बाबुराव चौधरी असे मृत पतीचे नाव आहे,तर ३२ वर्षीय वैशाली दुर्वास चौधरी असे आरोपी पत्नीचे नाव आहे.घटनेबाबत मृतकाची ७० वर्षीय आई सुनंदा बाबुराव चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी पत्नी विरोधात सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक- २१०/२०२५ अंतर्गत कलम १०३(१),११५ (२),३५२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुर्वास चौधरी हा नेहमी दारू पिऊन पत्नीशी भांडण करायचा.घटनेच्या एक दिवसापूर्वी त्याने दारूच्या नशेत जोरदार भांडण केले.त्यामुळे पत्नी वैशाली पतीच्या रोजच्या कीटकीटीला वैतागली होती. अश्यातच आज रविवारी पहाटेच्या सुमारास भांडणाचा वचपा काढण्याचे ठरवले आणि रागाच्या भरात झोपेत असलेल्या पतीचा रुमालाने गळा दाबून खून केला.प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -

