Tuesday, July 21, 2026
Homeपुणेनदीवरील पुल कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू..

नदीवरील पुल कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे आज,रविवार १५ जून रोजी दुपारी इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळण्याची धक्कादायक घटना घडली.पूल कोसळल्याने तब्बल २५ पर्यटक थेट नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दोन जणांचा मृत्यू झाला.तर ३८ जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यात एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूड यांनी दिली आहे.तसेच,या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डूड यांनी दिली.घटनेच्या वेळी ५० पेक्षा जास्त पर्यटक पुलावर होते.वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचे बोलले जात आहे.अश्यातच काही पर्यटक हे पुलाच्याखाली अडकून बसली होती.नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने  बचावकार्यास काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!