- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे आज,रविवार १५ जून रोजी दुपारी इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळण्याची धक्कादायक घटना घडली.पूल कोसळल्याने तब्बल २५ पर्यटक थेट नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दोन जणांचा मृत्यू झाला.तर ३८ जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यात एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूड यांनी दिली आहे.तसेच,या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डूड यांनी दिली.घटनेच्या वेळी ५० पेक्षा जास्त पर्यटक पुलावर होते.वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचे बोलले जात आहे.अश्यातच काही पर्यटक हे पुलाच्याखाली अडकून बसली होती.नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बचावकार्यास काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता.

- Advertisement -

