Saturday, March 15, 2025
Homeदेसाईगंजकोंढाळा गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली -शेतकरी बांधवांवर ओढवले मोठे संकट….
spot_img

कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली -शेतकरी बांधवांवर ओढवले मोठे संकट….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज :- गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण सुरक्षेच्या दृष्टीने व धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता धरणातून आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने आज १६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास १६ हजार ते १८ हजार क्युमेक्स पर्यंत विसर्ग सोडण्यात आला आहे.त्यानुसार विविध नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली व अनेक रस्ते बंद झाली.अशातच देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावापासून तीन किलोमटर अंतरावर पश्चिमेस असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले आहे.

कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांच्या जवळपास शेकडो हेक्टर शेती पुरबाधित झाल्याने उभे असलेले शेतातील संपूर्ण धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.संपूर्ण धानपिक नष्ट झाल्यास कित्येक शेतकरी बांधवांनी कर्ज काढून वखरणी,पेरणी,रोवणी व धानपिक होण्याची आशा बाळगून शेतीसाठी एकरी २० हजार रुपये खर्च केला.मात्र कृत्रीमरीत्या आलेल्या महापुराने शेतकरी बांधवांच्या सर्व आशेवर पाणी फेरल्या गेले आहे.पुरामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण धानपिक भुईसपाट होणार की काय?अशा वेळेस शेतकरी बांधवांनी काय करावे? असा विचार मनात घर करून सोडत आहे.

शेतीसाठी एकरी २० हजार रुपये खर्च करून शासन स्तरावरुन केवळ तुटपुंज्या स्वरूपात नुकसानभरपाई दिली जाते.शेतकरी बांधव कितीही राब-राब राबून नशीब फाटके ते फाटकेच असते.कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी अवकाळी पाऊस,कधी पावसाची कमतरता तर कधी पुराचा फटका व इतर अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. कृत्रिमरीत्या आलेल्या महापुराने कोंढाळा येथील शेतकरी बांधवांचे संपूर्ण धानपिक नष्ट झाल्यास यांस जबाबदार कोण? काही शेतकरी बांधवांनी धानपिका सोबतच तुर,भाजीपाला व इतर पिके लावली आहेत. अशातच पुराचा फटका बसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!