Friday, November 7, 2025
Homeदेसाईगंजकृषी पंपाचे ८ तासाचे भारनियमन रद्द करून १६ तास विद्युत पुरवठा सुरळीत...

कृषी पंपाचे ८ तासाचे भारनियमन रद्द करून १६ तास विद्युत पुरवठा सुरळीत करा– ओबीसी काँग्रेस कमिटी गडचिरोली तथा तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंजच्या वतीने निवेदाद्वारे मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- जिल्ह्यातीलशेतकरी बांधवांच्या कृषी पंपाच्या विद्युत पुरवठयाचे ८ तासाचे भारनियमन रद्द करून १६ तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासंबंधाने आज ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा ओबीसी काँग्रेस कमेटी तथा काँग्रेस कमिटी देसाईगंजच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता देसाईगंज यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांस निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले की, गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,अतिसंवेदनशील व आदिवासी जिल्हा असुन जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नाहीत.जिल्ह्यातील नागरिकांच्या उपजीविकेचे साधन केवळ धानपीक असून जिल्ह्यातील ९०% नागरिक धान पिकवरच अवलंबून आहेत.मागील तीन वर्षापासून शेतकरी बांधव सततच्या नापिकीला सामोरे जाऊन शेतकरी बांधवांनी यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरवश्यावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पीकाची लागवड केली असून यासाठी किमान १६ तास विद्युत पुरवठ्याची आवश्यकता आहे.मात्र महावितरण कंपनीने केवळ ८ तास विद्युत पुरवठा व ८ तास भारनीयमन घोषित केल्याने शेतकरी बांधवांचे धानपिक नष्ट होण्याची  शक्यता बळावली असल्याने कृषी पंपांना सुरळीत १६ तास वीज पुरवठा करण्याची तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार असतांना  मागणी करण्यात आली होती.

कृषी पंपाना ८ तास वीज पुरवठ्याचा निर्णय अतिशय गंभीर व शेतकऱ्यांना पुरते उध्वस्त करणारा असल्याने घेण्यात आलेला निर्णय तत्काळ रद्द करून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाना किमान १६ तास सुरळीत विज पुरवठा करण्यात यावा; अन्यथा महावितरण कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे दीलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन सादर करतेवेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु नरोटे,ओबीसी काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज ढोरे,ज्येष्ठ नेते परसराम टिकले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,उपाध्यक्ष नितीन राऊत,देसाईगंज युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे,मनोहर निमजे,बालाजी ठाकरे,सुरेश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,विलास बन्सोड,मंगेश गणविर,टिकाराम सहारे,शामराव पारधी,सोमेश्वर दिवठे,यादव पारधी,सचिन ठाकरे व काँग्रस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!