Sunday, September 6, 2026
Homeभंडाराअखेर शेतकऱ्यास ठार करणारा वाघ जेरबंद...

अखेर शेतकऱ्यास ठार करणारा वाघ जेरबंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथील शेतकऱ्यास वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना रविवार ३० मार्च रोजी घडली व ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास सर्वत्र उघडकीस आली होती.खैरी/पट येथील ४० वर्षीय शेतकरी डाकराम गोपीचंद देशमुख हे त्यांच्या मालकी शेत शिवारातील शेतात रविवारी सायंकाळच्या सुमारास मोटार पंपाद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला करून  ठार केले होते.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.वाघाने शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत वाघाला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती.अशातच टी-७५ नामक वाघिणीच्या २ वर्षीय शावकाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याचे उघडकीस येताच वाघाला पकडण्यासाठी दोन दिवसांपासून वन विभागाचे पथक मागावर होते. त्यासाठी जंगलात गस्त वाढवून १५ ट्रॅप कॅमेरे, एका ड्रोन कॅमेऱ्यामधून निगराणी सुरू केली होती. ४ मचाण उभारून त्यावर ४ शार्प शूटर ठेवण्यात आले होते.आठ ठिकाणी पिंजरेही लावण्यात आले होते. दरम्यान,दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मक्याच्या शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बांधून ठेवलेली शिकार खाण्यासाठी वाघ आला.हे लक्षात येताच पाळतीवर असलेल्या शार्प शूटरने वाघाला डार्ट दिला.त्यानंतर वाघ जवळपास ५० मीटर अंतरावर जाऊन बेशुद्ध झाला.त्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्याला पिंजऱ्यात कैद केले.मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या या कारवाईनंतर वेळ न दवडता,रात्रीच दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पिंजऱ्यात कैद करून वाघाला नागपूर येथील गोरेवाडा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात हलविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!