Saturday, May 30, 2026
Homeमुंबईदेशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जाणारे अभिनेता मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी...

देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जाणारे अभिनेता मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जाणारे अभिनेता मनोज कुमार यांचे आज,शुक्रवारी ४ एप्रिलला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.मनोज कुमार हे अनेक दिवसांपासून आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत होते. आज,शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मनोज कुमार देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जातात.मनोज कुमार यांनी सहारा, चांद, हनीमून,पूरब और पश्चिम, नसीब,मेरी आवाज सुनो, नील कमल,उपकार, पत्थर के सनम,पिया मिलन की आस यांसारख्या सिनेमांत काम केले होते.त्यांना नॅशनल अवॉर्ड,पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. लहानपणापासूनच त्यांना सिनेमांची आवड होती. त्यांना सिनेमे पाहायला आवडत असे.दिलीप कुमार यांचा सिनेमा शबनम वरून त्यांचे मनोज कुमार हे नाव ठेवले होते.त्यांनी १९५७ मध्ये फॅशन शो मधून अभिनयात पदार्पण केले होते.१९६५ मध्ये त्यांच्या करिअरमध्ये मोठा गेमचेंजर झाला.शहीद या सिनेमाने त्यांचे करिअरच बदलून टाकले.यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.मनोज कुमार यांचे सिनेमे केवळ हिटच झाले नाहीत तर त्यांची गाणीही लोकांच्या ओठांवर होती.त्यांचे उपकार या सिनेमातील गाणे ‘मेरे देश की धरती’ आजही लोकांच्या मन पटलावर ठेका धरायला लावते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!