Tuesday, July 7, 2026
Homeमुंबईवाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.केंद्र व राज्य सरकारकडून पुरवठा न मिळाल्यास मे महिन्यानंतर एसटीच्या भाड्यात वाढ करावी लागू शकते,असे त्यांनी स्पष्ट केले.आज,सोमवार १८ मे रोजी मंत्रालयात महामंडळाची बैठक पार पडली.बैठकीत बोलतांना सरनाईक म्हणाले की,एसटी महामंडळाला दररोज सुमारे १० लाख ८७ हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते.इंडियन ऑईल कंपनीकडून डिझेलचा पुरवठा होत असला तरी मागील आठवड्यात डिझेलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ झाली आहे.या वाढीमुळे महामंडळाला दररोज तब्बल ३३ लाख ७० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असून,वार्षिक तोटा १२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटले.जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकेत दिल्याचे सरनाईक म्हणाले.भविष्यात परिस्थिती कशी राहील हे सांगणे कठीण आहे.मात्र,केंद्र किंवा राज्य सरकारकडून विशेष सवलत मिळाल्यास एसटी भाडेवाढ टाळण्याचा प्रयत्न केला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.उद्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.मे महिन्यापर्यंत कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही.पुढील १० ते १२ दिवसांत सरकारकडून मदत मिळाल्यास दरवाढ टाळली जाईल,अन्यथा एसटीचे तिकीट दर वाढवावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.तिकीट दर वाढले तर याची झळ पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!