- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागल्यानंतर काल गुरुवारी मोठ्या दिमाखात शपथ विधीचा सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल,असे आश्वासन दिले. ‘आगामी काळात सुडाचे राजकारण चालणार नाही. शपथविधीला उद्धव ठाकरे,शरद पवार,राज ठाकरे अशा प्रमुख नेत्यांना मी फोन करून निमंत्रण दिले.महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पूर्ववत व्हावी,यासाठी मी प्रयत्नशील राहीन,’ असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार असून, निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे बहिणींना २१०० रुपये दिले जातील.मात्र,त्याचा विचार आम्ही आगामी अर्थसंकल्पात करू,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.त्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत अद्वितीय आणि अभूतपूर्व यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ना २,१०० रुपयांच्या मदतीसाठी एप्रिल २०२५पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- Advertisement -

