उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने हजेरी लावून पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरिपाच्या पिकांना जीवदान दिल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.जर कां पाऊस आणखी काही दिवस लांबणीवर गेले असते तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट ओढवले असते. अश्यातच आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी जोरदार पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,आज रविवार १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकाडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील बीड,परभणी,हिंगोली,जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.तसेच विदर्भातील अकोला,अमरावती,बुलढाणा,भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली,नागपूर,वर्धा,वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईसह कोकणात रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर,ठाणे आणि नवी मुंबई या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

