Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूर३८ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

३८ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका तरुण एसटी बस कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, शनिवार १७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास चिमूर बसस्थानक परिसरात उघडकीस आली.सुधीर माणिक भिलकर वय ३८ वर्षे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून भिलकर हे चिमूर बस आगारात कार्यरत होते.
आज शनिवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा वरून शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बस चिमूरकडे आली.सदरची बस ही बसस्थानक परिसरात येताच बसमधील काही विद्यार्थ्यांनी  खिडकीतून पाहिले असता एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.विद्यार्थ्यांनी घटनेची माहिती एसटी कर्मचाऱ्यांना दिली.कर्मचाऱ्यांनी तात्काळ चिमूर पोलिसांना पाचारण केले.ठाणेदार दिनेश लबडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!