Sunday, May 24, 2026
Homeचंद्रपूरसामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तथा बालरोग तज्ज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे(बेहरे)यांनी गुंजेवाही गावात पोहचून मुख्य वनसंरक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघड आव्हान देत,सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल,तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो, सर्वसामान्य नागरिकांचा जीव जातो,पण अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून फक्त आर्थिक मदतीची घोषणा करतात.त्यांना या मृत्यूचे दुःख होत नाही.जर सामान्य माणसाच्या जीवाची किंमत २५ लाख असेल,तर अधिकाऱ्यांनीही स्वतःला त्या परिस्थितीत उभे करावे. वनविभाग मृतांच्या कुटुंबीयांना १५ लाख आणि १० लाख अशा टप्प्यांत मदत देतो.आम्ही मात्र थेट २५ लाखांचा चेक देण्यास तयार आहोत.पण,त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः वाघाच्या जबड्यात जाण्याची तयारी दाखवावी,अश्या कडक शब्दांत वनविभागाच्या धोरणांवर हल्लाबोल केला.
गुंजेवाही येथील नागरिकांशी संवाद साधतांना डॉ. गावतुरे म्हणाल्या की,मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना अनेक वर्षापासून सुरू आहेत.कधी आईसमोरून लेकरू उचलले जाते,कधी काकाच्या मांडीवरून मुलाला वाघ घेऊन जातो,तर कधी शेतात काम करणाऱ्या महिलांचा बळी जातो.या घटना आता विदर्भातील ग्रामीण भागासाठी रोजचे वास्तव बनले आहे.यापूर्वीही या परिसरात तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आणि आता पुन्हा चार महिलांना जीव गमवावा लागला.या महिला कोणाची तरी आई,पत्नी,बहीण होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर वनविभाग २५ लाखांची मदत जाहीर करून आपली जबाबदारी संपल्यासारखे वागतो.पण,या घटना रोखण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना कां केल्या जात नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

उभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!