- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी(बा.)वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील नागभीड तालुक्याच्या गिरगाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे,रा.गिरगाव,ता.नागभीड या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.सदरची घटना ही शुक्रवार १९ जून २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.अश्यातच वनविभागाने तातडीने पावले उचलत परिसरात कडक सतर्कता उपाययोजना सुरू केल्या आहेत.वाघाच्या हालचालींचा अचूक मागोवा घेण्यासाठी वनविभागाने जंगल परिसरात आठ ट्रॅप कॅमेरे आणि एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे.या माध्यमातून वाघाच्या उपस्थितीची माहिती मिळवून त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.तसेच जंगलालगतच्या संवेदनशील भागांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर.कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक,क्षेत्र सहाय्यक आणि वनमजूरांची पथके परिसरात सतत गस्त घालत आहेत. जंगल परिसर तसेच शेतशिवारात नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वनविभागाने गावकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
- Advertisement -

