- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-खरिपातील धान पिकाचा हंगाम धडाक्यात आला आहे.धान पट्ट्यात हलक्या व मध्यम धान पिकाची कापणी व कापलेल्या धान पिकांच्या पेंड्या बांधणे यासह मळणीचे कामांनाही वेग आला आहे.बऱ्याच शेतकऱ्यांनी मळणी करून धान घरी साठवून ठेवली परंतु,अद्यापही शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत.केंद्र केव्हा सुरू होणार,याची विचारणा शेतकऱ्यांकडून होतांना दिसत आहे.
महिला मजूर धान कापणी तर,पुरुष मजूर कापणी केलेल्या धान पिकाच्या कडपा गुंडाळणी व मळणी करीत असल्याचे चित्र शेतशिवारात सर्वत्र पहावयास मिळत आहे.हिवाळ्याची सुरुवात झाल्याने हळूहळू थंडीची चाहूल असतानाही मजूर वर्ग आपल्या दैनंदिन दिनचर्येला न चुकता सामोरे जाताना दिसत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यात धान पीक कापणी व मळणीची कामे जोमात सुरू आहेत.
आधुनिक युगात शेतकरी जलद गतीने कामे करण्यासाठी सरसावला आहे.आधुनिकीकरणामुळे मशीनच्या साहायाने धान पीक कापणी व मळणी केली जात आहे.धान पिकाची कापणी झाल्यानंतर शेतातील बांध्यात कापून ठेवलेल्या धान पिकाच्या कडपा सुकल्यानंतर त्यांची बांधणी करावी लागते. यासाठी कमीतकमी चार-पाच दिवसांचा कालावधी लागतो.बांधणी केलेल्या धानाच्या कडपा मळणीसाठी एकत्रितपणे करून धान पिकाचे पुंजणे तयार केले जाते.सध्या स्थितीत कापणी,बांधणी व मळणीच्या कामात शेतकरी व मजूर व्यस्त आहेत.ग्रामीण भागात आधुनिक काळात सुद्धा अजूनही काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने धान कापणी करीत आहेत.महिला मजूर दिवसा कडक उन्हातही भात कापणीच्या कामात व्यस्त आहेत.हुंडा पद्धतीत ३००० रुपये प्रतिएकर तर, मजुरी २५० ते ३०० रुपये ठरलेली आहे.महिला व पुरुष मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने,मजूर वर्गात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.मात्र,अद्यापही शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झालेले नसल्याने नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांना धान विकावे लागत आहे.त्यामुळे धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.
- Advertisement -

