- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-वन्य प्राण्यांचे हल्ले थांबता-थांबेना,असे सर्वत्र झाले आहे.पशुंसह मानवावर हल्ले करून जिवानिशी ठार मारणाऱ्या वन्य प्राण्यांवरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत.अन्यथा हे असेच सुरू राहणार की काय? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.एका गोर-गरीब शेतकरी महिलेस शेतशिवारात काम करीत असताना दडी मारून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून शेतकरी महिलेच्या नरडीचा घोट घेऊन तिला ठार केल्याची खळबळजनक घटना काल,बुधवारी २९ जानेवारीच्या सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्याच्या कोका अभयारण्यालगत वसलेल्या कवलेवाडा गावातील शेतशिवारात घडली.नंदा किसन खंडाते वय ४७ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.घटनेनंतर वाघ घटनास्थळाजवळच ठाण मांडून बसला होता.
पाच दिवसांतील परिसरातील ही दुसरी घटना असून यापूर्वी याच वाघाने माटोरा येथे शुक्रवारी २४ जानेवारीला राजेश ताराचंद सेलोकर या ३५ वर्षीय तरुणाचा बळी बळी घेतला होता.या घटनेवरून गाव व परिसरात प्रचंड आक्रोश निर्माण झाला. वनविभागाने या नरभक्षी वाघाला ठार मारावे, अशी मागणी करण्यात आली.त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा व संतापाचा सामना करावा लागला.गावकऱ्यांनी वनविभागाच्या वाहनावर दगडफेकही केली.कवलेवाडा हे गाव कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येते.नंदा खंडाते यांचे शेत जंगलाला लागून आहे.त्या नेहमीप्रमाणे आपल्या शेतावर काम करीत होत्या.अचानक दडी मारून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार मारले.गेल्या आठवड्याभरापासून हा वाघ या परिसरातील गावांत हजेरी लावत आहे.माटोरा येथील घटनेनंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा हा वाघ याच परिसरात सर्पेवाडा तलावाजवळ आढळून आला होता.वनविभागाने आणि गावकऱ्यांनी फटाके फोडून त्याला हुसकावून लागले होते.गेल्या काही दिवसांपासून वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे.अशातच मानवी रक्ताची चटक लागलेल्या या वाघाने नंदा खंडाते यांचा बळी घेतला आहे.घटना घडल्यानंतर गावकऱ्यांत प्रचंड संताप आणि रोष पसरला होता.घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली. गावकरी महिलेच्या मृतदेहाजवळच ठाण मांडून बसले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या पथकाला गावकऱ्यांचा रोषाला सामोरे जावे लागले.
- Advertisement -

