- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात असल्याने पुढील काळात काही वस्त्यांमध्ये मानवाचे वास्तव्य कमी आणि वाघोबांचेच राज्य दिसून येणार की काय?असा प्रश्न निर्माण झालेला असतांनाच चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील जनकापूर जंगल परिसरालगतच्या शेतात वाघाने हल्ला चढवून एका शेतकऱ्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.सदरची घटना काल मंगळवारी घडली असून घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रमेश जयराम काशीवार वय ५५ वर्षे,असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.शेतकरी रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास जंगल परिसरालगत असलेल्या शेतावर गेले होते. दरम्यान,जंगल परिसरातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.शेतावर गेलेले रमेश काशीवार सायंकाळ होऊनही घरी परतल्याने नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आले.यानंतर घटनेची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली व पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली.
- Advertisement -

