Wednesday, June 24, 2026
Homeभंडारालग्नासाठी ॲडवान्स दिलेली रक्कम परत देण्यास मंगल कार्यालयाने दिला नकार; ग्राहक मंचाने...

लग्नासाठी ॲडवान्स दिलेली रक्कम परत देण्यास मंगल कार्यालयाने दिला नकार; ग्राहक मंचाने दिला दणका..!- भंडारा येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- येथील छगन डेकाटे व मनीषा बांते यांनी मुलीच्या लग्नासाठी गुरुकृपा मंगल कार्यालयाची बुकिंग केली होती.मात्र कोरोना काळात मंगल कार्यालयात लग्न समारंभ करण्यासाठी शासनाने निर्बंध घातले होते.त्यामुळे गुरुकृपा मंगल कार्यालयात लग्न समारंभ न करता घरीच लग्न करण्यात आले. त्यामुळे छगन डेकाटे व मनीषा बांते या दोघांनीही मंगल कार्यालय संचालकाला बुकिंगसाठी दिलेली अनामत रक्कम परत मागितली असता मालकाने बुकिंग रक्कम परत देण्यासाठी नकार दिला.सदर घडलेल्या प्रकारामुळे दोघांनीही भंडारा येथील जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.तक्रारीसोबत शासनाने निर्गमित केलेले निर्बंध आदेश जोडले.दोन्ही तक्रारीची दखल घेऊन ग्राहक आयोगाचे अध्यक्ष भास्कर योगी व सदस्या वृषाली जहागिरदार यांनी मंगल कार्यालय मालकाला आदेश देऊन अग्रीम(ॲडवान्स) रक्कम ९ टक्के व्याजदराने परत करावे आणि दहा हजार रुपये खर्च स्वरूपात तक्रारकत्यांना द्यावे; असे आदेश ग्राहक तक्रार मंचाने दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!