Thursday, August 6, 2026
Homeभंडारापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग.. - यंत्रणांना...

पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग.. – यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ४० क्युमेक्स पाणी(४० हजार लिटर प्रति सेकंद)सोडण्यात आले असून धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार सदरचे विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी अधिक करण्यात येणार आहे.पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने नदीकाठावर किंवा नदीपात्रात ये-जा करणाऱ्या नागरिकांनी,मच्छिमारांनी तसेच पशुपालकांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नागरिकांनी नदी क्षेत्रापासून दूर राहावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.यासोबतच संबंधित यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपापल्या स्तरावर आवश्यक ती खबरदारी घ्यावी व सदरची माहिती तातडीने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी,असेही प्रशासनाने नमूद केले आहे.प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून,गरज भासल्यास पाणी विसर्जनाच्या प्रमाणात बदल केला जाईल.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व फक्त प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे,असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!